congress slams mamata banerjee : ‘तृणमूल काँग्रेस राजकारणातील गद्दार’, ममतांवर काँग्रेसची जळजळीत टीका


कोलकाताः तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसवर टीका केलीय. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला आहे. कोणत्या पक्षातून ( काँग्रेस ) जन्माला आलो आहोत हे तृणमूल काँग्रेसने लक्षात घेतले पाहीजे, असा टोला अधीर रंजन चौधरी यांनी लगावला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात निवडणूक प्रचारादरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसला राजकारणावर गांभीर नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक मजबूत होतील, असे म्हणत ममतांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. काँग्रेसमधील निर्णय क्षमता संपल्यामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा आरोपही ममता बॅनर्जींनी केला होता. ममता बॅनर्जींच्या या आरोपांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर घणाघात केला आहे. तृणमूल काँग्रेस राजकारणातील गद्दार आहे. टीएमसी राजकारण करते, पण शिष्टाचार विसरते. आणि आपली परिस्थिती नाकारते, असेही ते म्हणाले.

owaisi slams akhilesh yadav : ओवेसी अखिलेश यादवांवर भडकले; म्हणाले, ‘जिनांशी भारतीय मुस्लिमांचा काय संबंध…’

विरोधांच्या एकजुटीची भाषा करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी भाजपसोबत युती का केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये मंत्री का झाल्या?, असा सवाल चौधरी यांनी शनिवारी उपस्थित केला होता. काँग्रेसने पाठिंबा देऊनही तुम्ही आमच्यावर समाधानी नसाल तर बंगालची जनता करेल? तुम्ही काँग्रेसला जशी वागणूक देत आहात, तशीच वागणूक तुम्हाला तीनदा जिंकून दिलेल्या जनतेला देणार का?, असे सवालही अधीर रंजन चौधरी यांनी केले. दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत गोव्यातील सर्व ४० जागांसाठी उमेदवार उभे करणार असल्याचे तृणमूलने जाहीर केले आहे.

‘जिनांची तुलना सरदार पटेलांशी करता, अखिलेश यादव तालिबानी मानसिकतेचे’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: