अखेरच्या चेंडूवर पराभव; वर्ल्डकपमधून हा संघ सर्वात प्रथम बाहेर पडला


शारजाह: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात गतविजेत्या वेस्ट इंडिजने बांगलादेशचा ३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले आहे. तर बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने ७ बाद १४२ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल बांगलादेशला ५ बाद १३९ धावा करता आल्या. या पराभवामुळे त्याचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले असून स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला आहे.

वाचा- भारतासाठी न्यूझीलंडचा हा खेळाडू आहे सर्वात धोकादायक; आव्हान

नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला होता. त्यांनी वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्याची सुरूवात खराब झाली. गेल ४ आणि लुईस फक्त ६ धावांवर बाद झाला. रोस्टन चेजच्या ३९ आणि निकोलस पुरनच्या २२ चेंडूतील ४० धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने १४२ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशकडून मेहदी हसन, शोरिफुल इस्लाम मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

वाचा- धावा करता येत नाही म्हणून कर्णधाराने मैदान सोडले; पाहा टी-२० वर्ल्डकपमधील प्रकार

बांगलादेशकडून लिटन दासने ४४ धावा केल्या. त्यांना विजयासाठी अखेरच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण बांगलादेशच्या फलंदाजांना या षटकात एकही मोठा शॉट खेळता आला नाही. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना रसेलने यॉर्कर चेंडू टाकला आणि एकही धाव निघाली नाही. बांगलादेशचा ग्रुप फेरीतील सलग तिसरा पराभव ठरला. याआधी त्यांचा श्रीलंकेने ५ विकेटनी आणि इंग्लंडनी ८ विकेटनी पराभव केला होता.

वाचा- ‘या’ खेळाडूला IPLनंतर घरी पाठणार होते बीसीसीआय; तरी खेळतोय टी-२० वर्ल्डकप

वाचा- जे गेल्या १८ वर्षात झाले नाही ते टीम इंडियाला या रविवारी करावे लागले; नाही तर…

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशला थेट प्रवेश मिळाला नव्हता. त्यांनी पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत स्कॉटलंड संघाने त्यांना पराभवाचा धक्का दिला होता. तेव्हा बांगलादेश संघावर मुद्दा पराभूत झाल्याचा आरोप देखील झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: