तसंच, ‘आर्यन खानला आता जामीन मिळाला आहे आणि ज्याने आर्यन खानला पकडलं तो आता कायद्याविरुद्ध जे काही काम झालं त्यावर मार्ग काढण्यासाठी फिरतोय. कोर्ट कचेऱ्या आता त्याच्या मागे लागतील,’ असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.
आता कायदाच काय ते बोलेल; नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया
आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर भाजपनं आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्याल का?, अशी टीका केली होती. ‘भाजपच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेलं नाही. आता नुकसान झालं तेव्हा दहा हाजारांची मदत जाहीर झाली. त्याप्रमाणे वाटपही व्हायला लागलं आहे. भाजपच्या तपास यंत्रणा जिथे भाजपविरोधी सरकारे आहेत तिथे अतिरेक करत आहेत. चुकीचे अधिकारी चुकीचे काम करत आहेत व जनतेला त्रास देत आहेत,’ असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
वाचाः धक्कादायक! एसटी बसमध्येच गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
समीर वानखेडे प्रकरणात आता धार्मिक वळण घेतलं आहे. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘इथे हिंदु मुस्लीमचा काही संबंध नाही. भाजप चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणांचा वापर करत आहेत. ते सर्व नवाब मलिक उघडकीस आणत आहेत.’