पंड्या खोट बोलत असेल असे वाटत नाही कारण स्वत:च्या फिटनेसबद्दल त्यालाच जास्त माहिती असेल. किंवा निवड समितीला संघ व्यवस्थापनाने पंड्याबाबत असे सांगितले असेल की तो वर्ल्डकपपर्यंत गोलंदाजी करण्यास फिट होईल. पण मग निवड समितीने हार्दिकचा फिटनेस रिपोर्ट पाहिला नाही का असा प्रश्न समोर येतो. निवड समितीने इतका मोठा निर्णय फक्त तोडी आश्वासनावर घेतला? भारतीय संघाची घोषणा युएईमध्ये आयपीएलचा दुसरा टप्पा सुरू होण्याच्या आधी झाली होती. आयपीएलमध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्सकडून खेळताना एकही चेंडू टाकला नाही. भारताचा उपकर्णधार रोहित शर्माला जेव्हा ९ ऑक्टोबर रोजी विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, हार्दिक पुढील आठवड्यापासून गोलंदाजी करले असे म्हटले होते. फिजिओ आणि ट्रेनर त्याच्या सोबत फिटनेसवर काम करत आहेत, तो दिवसे दिवस चांगला होतोय. अर्थात योग्य माहिती डॉक्टर आणि फिजियो देऊ शकतील.
भारताचा कर्णधार विराट कोहलीला २३ ऑक्टोबर रोजी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला स्पर्धेत एका सामन्यात हार्दिक दोन ओव्हर टाकू शकले. पुन्हा एकदा चेंडू निवड समितीच्या कोर्टात येतो. आयसीसीने संघात बदल करण्याची मुदत वाढवली. या काळात निवड समितीला दिसत होते की हार्दिक मुंबईसाठी गोलंदाजी करत नाही. तेव्हा संघात बदल करण्याची संधी होती. पण त्यांनी तसे केले नाही. निवड समितीने हार्दिकला गोलंदाजी करता येत नाही म्हणून फिरकीपटू अक्षर पटेलला संघाबाहेर केले आणि जलद गोलंदाज शार्दूल ठाकूरचा १५ मध्ये समावेश केला. निवड समितीने निर्णय घेतला असला तरी ते कठोर निर्णय घेऊ शकले नाहीत.
पंड्या सध्या गोलंदाजी करू शकत नाही
वर्ल्डकप सुरू होण्याआधी भारताने दोन सराव सामने खेळले. यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पंड्या गोलंदाजी तर दुरच पण वेगाने वाकू देखील शकत नव्हता. ही गोष्ट टीव्हीवर पाहणाऱ्या लोकांना जाणवत होती तर संघातील लोकांना का जाणवत नाही. अशी कोणती मजबूरी आहे ज्यामुळे हार्दिकला संघात ठेवावे लागत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिकने ८ चेंडूत ११ धावा केल्या त्याच एक चौकार त्याच्या बॅटला लागून मागच्या बाजूला गेला. तर दुसरा चौकार त्याने फुलटॉस चेंडूवर मारला. पाकिस्तानच्या गोलंदाजांना कल्पना होती की त्याच्या कंबरेला दुखापत आहे. त्यामुळे ते हार्दिकला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकत होते. यामुळेच त्याने दोन चेंडू मिस केले. इतक नाही तर फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली आणि स्कॅन करण्यासाठी दवाखाण्यात घेऊन जावे लागले.
हार्दिक पंड्या फिट नसले तर त्याला का खेळवले जात आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे त्याला संघात ठेवलय. हार्दिकला फिट होण्यास वेळ दिला पाहिजे. गोलंदाजीच्या जोरावर नाही तर आता तर तो फलंदाजीच्या जोरावर देखील सामना जिंकून देईल असे वाटत नाही. भारतीय संघातील कर्णधार विराट, उपकर्णधार रोहित आणि मेंटर धोनीला हार्दिक आवडतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी हार्दिकने पाठ ठीक असल्याचे म्हटले होते. पण मी आता गोलंदाीज करणार नाही. नॉकआउट सामन्यात गोलंदाजी करू शकेन असे म्हटले होते.
ऑक्टोबर २०१९ मध्ये हार्दिकवर लंडनमध्ये लोअर बॅक सर्जरी करण्यात आली होती. त्यानंतर तो मैदानावर चमकदार कामगिरी करू शकला नाही. २०१८ नंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. टी-२० मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात मिळून त्याने २ ओव्हर टाकल्या. या सहा सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. पम त्याचा फॉर्म नेहमी प्रमाणे दिसला नाही.