‘आर्यन खानसाठी गळा काढणाऱ्या मंत्र्यांचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’; भाजप काढणार महामोर्चा


हायलाइट्स:

  • शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक
  • १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
  • गिरीश महाजन यांनी दिली माहिती

जळगाव : ‘जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. मात्र, शेतकऱ्यांचा नावावर राजकारण करणाऱ्या राज्य शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेलं असताना राज्य शासनाकडून त्यांची वीज तोडण्यात येत आहे, या विरोधात भाजपाकडून १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,’ अशी माहिती भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) यांनी दिली आहे.

मंगळवारी शहरातील जी. एम. फाऊंडेशनच्या कार्यालयात भाजपच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाजन बोलत होते. या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगरप्रमुख दीपक सुर्यवंशी, नगरसेवक राजेंद्र घुगे-पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

sameer wankhede : समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप, NCB चं पथक उद्या मुंबईत येणार

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यात जिल्हाभरातील शेतकरी देखील सहभागी होणार असल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं. ‘शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं गेलं आहे. अशा परिस्थितीत बिलांची रक्कम भरण्याचं फर्मान राज्य शासनानं काढला आहे. तसंच ही रक्कम न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद केला आहे. अशा शेतकरी विरोधी शासनाचा आम्ही निषेध करतो, असंही गिरीश महाजन म्हणाले. जळगावात होणारा हा मोर्चा भूतो न् भविष्यती राहील, असा दावा देखील त्यांनी केला.

Aryan Khan Bail Hearing: आर्यनविरुद्ध ड्रग्जची केसच होऊ शकत नाही!; वकिलांनी कोर्टात केला ‘हा’ दावा

‘आर्यन खानसाठी मंत्रिमंडळ कामाला आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष’

‘एका आर्यन खानसाठी राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळ कामाला लागलं आहे. यासाठी एका कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर आरोप केले जात आहेत. आर्यन खानसाठी गळा काढणाऱ्या राज्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्नावर मात्र गळा काढला नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी गळा काढला नाही. शेतकरी अडचणीत आहे. मात्र, शेतकऱ्यांपेक्षा त्यांना आर्यन खान प्रिय वाटत आहे,’ असा घणाघातही गिरीश महाजन यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: