Madhay Pradesh: अभिनेता बॉबी देओलला धुंडाळत बजरंग दलाचा ‘आश्रम’च्या सेटवर हल्ला


हायलाइट्स:

  • मध्य प्रदेशातील भोपाळमधली घटना
  • ‘आश्रम ३’ वेब सीरीजचं चित्रिकरण सुरू
  • दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या तोंडावर शाई फेकली

भोपाळ : भोपाळमध्ये रविवारी सिने-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम-३’ या वेबसीरीजच्या शुटिंग दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अचानक घुसून हल्ला केला. यावेळी, या दंगेखोरांनी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या तोंडावर शाही फेकण्यात आली तर इतर कर्मचाऱ्यांसोबत मारहाण करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिनेता बॉबी देओलला शोधत चित्रिकरणस्थळी दाखल झाले होते. ‘बजरंग दल‘ ही ‘विश्व हिंदू परिषदे’शी निगडीत एक शाखा आहे.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देत चित्रिकरण स्थळावर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद अशा घोषणाही दिल्या.

प्रत्यक्षदर्शींनी ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलीय. या व्हिडिओमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते चित्रिकरणाच्या सेटवर धुमाकूळ घालताना आणि इथं काम करणाऱ्या सदस्यांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत.

ashok khemka transfer : IAS अधिकारी अशोक खेमकांची पुन्हा बदली, २९ वर्षांत ५४ बदल्या
lalu prasad yadav slams congress : ‘भक्तचरण दास नाही, तो तर ‘भकचोन्हर दास’ आहे’, काँग्रेसवर भडकले लालू यादव

‘हिंदुत्वाचा अपमान’

बॉबी देओल अभिनित दिग्दर्शक प्रकाश झा यांची ‘आश्रम’ ही वेब सीरीज हिंदुत्वाचा अपमान करत असल्याचं ‘बजरंग दला’च्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. झा यांनी आश्रम – १, आश्रम – २ या वेब सीरीज बनल्या आता ते आश्रम – ३ बनवत आहेत. जेव्हापर्यंत या सीरीजचं नाव बदललं जात नाही तेव्हापर्यंत या सीरीजचं प्रसारण होऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. आश्रमाच्या माध्यमातून भोंदू गुरू, बाबा महिलांचं शोषण करत असल्याची दृश्यं प्रकाश झा यांनी आपल्या वेबसीरीजमध्ये दाखवली आहेत. चर्च आणि मदरशांसंबंधी असं चित्रिकरण करण्याची त्यांची हिंमत आहे का? असा प्रश्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला.

बॉबी देओलनं आपल्या भावाकडून काहीतरी शिकावं आणि देशभक्ती दर्शवणारे सिनेमे तयार करावेत, असा अनाहुत सल्लाही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अभिनेत्याला दिलाय.

‘वेब सीरीज’चं नाव बदलून प्रश्न सुटणार?

प्रकाश झा यांनी यांच्याकडून या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. तसंच त्यांच्याकडून सीरीजचं नाव बदलण्याचंही आश्वासन देण्यात आल्याचं, बजरंग दलाच्या एका नेत्यानं म्हटलंय.

पोलिसांत तक्रार नाही

या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई केली जाईल. तोडफोड आणि मारहाण करणाऱ्या असामाजिक तत्त्वांना अटक केली जाईल, असं पलिसांनी म्हटलंय. परंतु, आपल्याकडे आतापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नसली तरी पोलीस उपद्रवी लोकांवर कारवाई करतील असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

अंबानी-आरएसएस संबंधित व्यक्तींकडून ३०० कोटींची लाच, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट
अनिल देशमुख क्लीन चिट प्रकरण; ‘त्या’ सीबीआय अधिकाऱ्याचा जामीन फेटाळला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: