पाकिस्तानने मारला ‘मौका’वर चौका, भारतावर पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभूत होण्याची नामुष्की ओढवली

दुबई : विश्वचषकाच्या इतिहासात भारतावर पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभूत होण्याची आपत्ती ओढवली. आतापर्यंत एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघ कधीच पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. पण विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ही विजयाची परंपरा कायम राहिली नाही. भारताने पाकिस्तानपुढे विजयासाठी १५२ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पाकिस्तानच्या फलंदाजांनी हे आव्हान सहजपणे पेलवले आणि इतिहास बदलला.