महागाई दरामध्ये होणार घट
जुलै-ऑगस्ट दरम्यान महागाई कमी झाल्यामुळे एमपीसीचा दृष्टिकोन आणि आर्थिक धोरणात्मक भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने मध्यम राहिल्याने अन्न महागाईत लक्षणीय घट झाली आहे.
अवकाळी पावसाची भूमिका ठरणार महत्वाची
दास पुढे म्हणाले की, जर अवकाळी पाऊस पडला नाही, तर विक्रमी खरीप उत्पादन, पुरेसा अन्नसाठा, पुरवठा आणि अनुकूल आधारभूत परिणामांमुळे अन्न-धान्य महागाईत घट कायम राहील, पण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.