अशा प्रकारची प्रकरणे लक्षात घेत आरबीआयने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता जर तुम्हाला एटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंगमधून कोणताही व्यवहार करायचा असेल, तर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, ज्यात तुम्ही योग्य व्यवहार केला आहे की चुकून याची खात्री होईल. या संदेशात तुम्हाला एक फोन नंबर देखील दिला जाईल. जर तुम्ही तो व्यवहार चुकून केला असेल, तर तुम्ही लगेच त्या फोन नंबरवर सांगू शकता की, हा व्यवहार चुकून झाला आहे. अशा मेसेजवर तुमच्या बँकेला त्वरित कारवाई करावी लागेल, असे निर्देश RBI ने दिले आहेत.
तुम्ही काय करू शकता?
जर तुमच्याकडून अशी काही चूक झाली, तर ताबडतोब तुमच्या बँकेला त्याबद्दल माहिती द्या. व्यवहार फसवणुकीमुळे झाला आहे किंवा तुमची चूक झाली, याचा तपशील बँकेला द्या. तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता किंवा तुम्ही स्वतः बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला कोणाच्या खात्यात पैसे गेले, त्याचे बँक खाते, तारीख, वेळ इत्यादी सर्व काही सांगावे लागेल. ज्याला तुम्ही पैसे पाठवले आहेत, त्या बँकेशी तुमची बँक संपर्क साधू शकते.
पैसे परत करण्यास नकार दिला तर …
जर बँकेने संपर्क साधूनही प्राप्तकर्त्याने पैसे परत करण्यास नकार दिला, तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्हाला प्रकरण न्यायालयात घेऊन जावे लागेल. तुम्ही केलेला व्यवहार बँकेत आणि कोर्टात तपासला जाईल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, जर तुम्ही चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील, तर जबाबदारी तुमची बनते, अशा परिस्थितीत बँकसुद्धा त्यासाठी जबाबदार नाही.
जर तुम्ही प्राप्तकर्त्याचा खाते क्रमांक चुकून टाकला असेल आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील, तर तुमचे पैसे आपोआप परत जमा होतील, पण जर तुम्ही यूपीआय (UPI) व्यवहाराच्या वेळी चुकीचा खाते क्रमांक प्रविष्ट केला असेल, तर तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.