अमरिंदर सिंग यांनी माध्यम सल्लागार रवीन ठकराल यांच्या माध्यमातून ट्विट करून काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल १४ वर्षे भाजपमध्ये होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे यापूर्वी भाजपमध्ये होते. पटोले आणि रेवनाथ रेड्डी हे आरएसएसमधून नाही तर मग कुठून आले आहेत? परगट सिंग हे चार वर्षे अकाली दलात होते. यामुळे काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारू नये, असं अमरिंदर सिंग यांनी ट्विटमधून म्हटलं आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हे केंद्राच्या नवीन सुधारित कृषी कायद्यांशी आपला संबंध जोडत आहेत. पण गेले १५ वर्षे आपण पंजाबमध्ये पिक पद्धतीत मोठे बदल केले आहेत. तरीही आपला संबंध कृषी कायद्यांशी जोडला जात आहे. नवज्योत सिंग सिद्धू किती विश्वासघातकी आणि चालबाज आहे, हे यावरून स्पष्ट होतं. एवढचं काय तर आपण अजूनही कृषी कायद्यांविरोधात आहोत. या कायद्यांविरोधात आपण अजूनही लढतोय. त्यासाठी स्वतःचं राजकीय भवितव्य पणाला लावलं आहे, असं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.
mamata banerjee to visit goa : गोव्यातही ‘खेला होबो’! CM ममता बॅनर्जी पहिल्यांदाच येणार भेटीवर
केंद्रातील तीन नवीन सुधारीत कृषी कायद्यांचे शिल्पकार हे अमरिंदर सिंग आहेत. काही कॉर्पोरेट्सना फायदा पोहोचवण्यासाठी ते काम करत आहेत, असा आरोप पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी केला आहे. त्याला कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Selfie With Priyanka Gandhi: प्रियांका गांधींसोबत सेल्फीनं वाढवल्या महिला पोलिसांच्या अडचणी