IPL फायनल: कोणाचे पारडे जड? असे आहे पिच, हवामान आणि रेकॉर्ड


दुबई: चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज आयपीएल २०२१ची फायनल होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत दोन वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांची कसोटी लागणार आहे. चेन्नईचा कर्णधार धोनी आणि केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन या दोघांनी त्याच्या देशांना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. आयपीएलमध्ये चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली ३ वेळा तर केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली २ वेळा विजेतेपद मिळवले आहे.

वाचा- चेन्नईने २०० धावा केल्या तरी विजयाची हमी नाही; KKR देऊ शकतो मोठा धक्का

आयपीएलच्या १४व्या हंगामात चेन्नईची कामगिरी सर्वात सातत्यापूर्ण झाली आहे. या उटल कोलकाताने पहिल्या सत्रात फक्त २ विजय मिळवले होते. पण त्यानंतर त्यांना चांगली लय सापडली. अखेरच्या ७ पैकी ५ आणि त्यानंतर आरसीबी आणि दिल्लीचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केलाय. चेन्नईला गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवता आला नव्हता यावेळी त्यांनी सर्वात आधी प्लेऑफ आणि त्यानंतर फायनलमध्ये प्रवेश केलाय. चेन्नईची ही नववी फायनल तर केकेआरची तिसरी फायनल आहे.

वाचा- आजवर कोणाला न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड होणार; धोनी ठरणार जगातील पहिला…

असे आहे पिच

अंतिम मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर होणार आहे. दुबईचे पिच थोडी धिमी असली तरी ती फलंदाजीसाठी शानदार आहे. या मैदानावर दुसऱ्या सत्रात झालेल्या ११ लढतीत ९ वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. या मैदानावरील सरासरी धावसंख्या १५२ इतकी आहे. दुबईचे हवामान गरम असल्याने पण खेळाडू गेल्या काही दिवासांपासून तेथे असल्याने याचा फार फटका बसणार नाही.

वाचा- IPL फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव निश्चित; या एका गोष्टीचे धोनीकडे उत्तर नाही

अंतिम सामन्यातील केकेआरचे रेकॉर्ड चेन्नईपेक्षा चांगले आहे. भलेही चेन्नईने ८ फायनल खेळल्या असले तरी त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झालाय. तर केकेआरने दोन वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आणि दोन्ही वेळा विजेतेपद मिळवले आहे. यापैकी एका फायनलमध्ये त्यांनी चेन्नईचा पराभव केला होता.

या दोन्ही संघात आयपीएलमध्ये आतापर्यंत २५ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १६ मध्ये चेन्नईने तर फक्त ८ मध्ये केकेआरने विजय मिळवलाय. एका सामन्याचा निकाल लागला नाही. आयपीएलच्या या हंगामात दोन्ही संघात झालेल्या दोन लढतीत चेन्नईने बाजी मारली होती. पहिल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २२० धावा केल्या होत्या. उत्तरादाखल केकेआरचा संघ २०२ धावा ऑलआउट झाला तर दुसऱ्या लढतीत केकेआरने दिलेल्या १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने २ विकेट राखून पार केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: