हायलाइट्स:
- विजयादशमीला संघ स्वयंसेवकांना संबोधित करताना भागवत यांनी संबोधित केलं.
- बिटकॉइन आणि ओटीटी सारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- समाजहितासाठी या गैरप्रकारांना वेळीच रोखायला हवं त्यावर नियंत्रण ठेवायला हवे असे भागवत यांनी सांगितले.
पेमेंट करणं झालं सोप्प; फोन पे, एसबीआय आणि ICICIमध्ये सेट करा ऑटो-पे
भागवत म्हणाले की बिटकॉईनवर सध्या कोणत्याच देशाचे नियंत्रण नाही. तरुणाई अशा गोष्टींच्या आहारी जात आहे. त्यामुळे समाज हिताच्या दृष्टीने अशा गोष्टींवर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज तरुणाई बिटकॉइन, ओटीटी आणि ड्रग्जमध्ये गुंतली आहे. त्यामुळे समाज
हितासाठी या गैरप्रकारांना वेळीच रोखायला हवं त्यावर नियंत्रण ठेवायला हवे असे भागवत यांनी सांगितले.
करोना रोखण्यासाठी टाळेबंदी लागू झाल्यानंतर लहान मुलांच्या हाती मोबाईल आले. ऑनलाईन शिक्षण असले तरी मुलं मोबाईलमध्ये गुंतली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. याबाबत सरकारने विचार करायला हवा, असे भागवत यांनी सांगितले.
ई-फायलिंगला प्रतिसाद; दोन कोटींहून अधिक विवरणपत्रे सादर, जाणून घ्या नवीन डेडलाईनकरोना संकटात आपल्याला बचतीची सवय लागली होती. ही सवय करोनाचे समूळ उच्चाटन झाल्यानंतर देखील कायम ठेवायला हवी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. करोना संकटात अनेकांनी कमी खर्चात आपली लग्न उरकली. आता अवास्तव खर्च कमी करायला हवा असे त्यांनी सांगितले. यातून शिल्लक उरणारा पैसा अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात खर्च करायला हवा असा सल्ला त्यांनी दिला.
गोल्ड लोन झालं स्वस्त ; सार्वजनिक क्षेत्रातील या बँंकेने सणासुदीला कमी केला व्याजदर
चॅनलेसिस या संस्थेच्या आकडेवारीनुसार भारतात मागील वर्षभरात क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक ४० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. आजच्या घडीला देशात १.५ कोटीहून अधिक गुंतवणूकदार आहे ज्यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांमध्ये १८ ते ३५ वयोगटातील गुंतवणूकदारांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या संस्थेने म्हटलं आहे.