uddhav thackeray : मुख्यमंत्रीसाहेब आठवतंय का? रिफायनरी विरोधकांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र
लोकांचा विरोध असेल तर रिफायनरी लादणार नाही, अशीच महाविकास आघाडी व शिवसेना पक्षाचीही भूमिका आहे, असे आम्ही मानतो. पण देवाचे गोठणे, शिवणे खु., सोलगाव, गोवळ, धोपेश्वर आणि आंबोळगाड या गावांचे रिफायनरी विरोधाचे मासिक सभांचे नव्हे तर ग्रामसभाचे ठराव झालेले आहेत. आपल्याकडे देण्यासाठी ५००० ग्रामस्थांचे रिफायनरी विरोधात सह्यांचे निवेदन आम्ही खासदार विनायक राऊत यांचेकडे दिले होते. १८ मार्चला आझाद मैदानावर २००० ग्रामस्थांनी धरणं आंदोलन केले. तेव्हाही आपल्याला भेटण्यासाठीचे निवेदन देण्यात आले. पण भेट सोडा कुठलाही निरोप आम्हाला आला नाही. आमच्या प्रामाणिक आंदोलनाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले गेले, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हाला आमची भूमिका मांडण्यासाठी वेळ दया, अशी विनंती या पत्रात करण्यात आला आहे.
कोकणात राजकीय वातावरण तापलं, दोन वजनदार नेते ईडीच्या रडारवर?
आम्ही ५००० हून अधिक स्थानिक ग्रामस्थांनी ३० मार्चलातहसील कार्यालयावर रिफायनरी विरोधात मोर्चा काढला होता. आपल्यापर्यंत स्थानिकांची विरोधाची भूमिका पोहचली आहेच. पण प्रत्यक्ष भेटून ती सविस्तरपणे आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्हा स्थानिक ग्रामस्थानां वेळ द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. राज्यपालांनाही भेटीसाठी वेगळे पत्र देण्यात आले आहे.
मोठी बातमी! खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर सहा वर्षांसाठी अपात्रतेची कारवाई