नवी दिल्लीः काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाचे बुधवारी प्रकाश झाले. या पुस्तकात त्यांनी हिंदुत्वाविषयी जे काही म्हटले आहे त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि आयसिस या दहशतवादी संघटनांशी केली आहे. यावरून भाजपने संताप व्यक्त केला आहे. यामुळे फक्त हिंदूच नव्हे तर भारताच्या आत्म्यालाही ठेच पोहोचली आहे, असं भाजपने म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांनी या प्रकरणावरून मौन सोडावे आणि याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. ही विचारसरणी शशी थरूर यांची आहे की मणिशंकर अय्यर यांची आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशात प्रचार करत असलेल्या प्रियांका गांधी हे बोलण्याचे धाडस करतील का? स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर सहिष्णुता दाखविणाऱ्या १०० हिंदूंशी ही तुलना करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. सोनिया राहुल गांधींच्या इशाऱ्यावरून हिंदूंचा हा अपमान होत आहे. निवडणुका आल्या की राहुल आणि प्रियाका गांधी हे इच्छाधारी हिंदू बनतात, असं भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले.
UP Elections: ५० वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या ‘हिंदू-बंगाली’ कुटुंबांना यूपीत मिळणार हक्काची जमीन
खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार
सलमान खुर्शीद यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. हिंदुत्वाची दहशतवादाशी तुलना करून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. खुर्शीद यांच्या sunrise over ayodhya nationhood in our times या पुस्तकातील वक्तव्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे.
BJP MP Pragya Singh: ‘अजान’मुळे ‘आरती’त विघ्न, ध्यानात भंग; भाजप खासदाराची आक्षेपार्ह वक्तव्यं
Source link
Like this:
Like Loading...