UP Elections: ५० वर्षांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या ‘हिंदू-बंगाली’ कुटुंबांना यूपीत मिळणार हक्काची जमीन


हायलाइट्स:

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२
  • कानपूर ग्रामीण भागात ६३ हिंदू बंगाली कुटुंबांचं पुनर्वसन
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय

लखनऊ : वर्ष १९७० दरम्यान पाकिस्तानातून भारतात दाखल झालेल्या ६३ हिंदू बंगाली कुटुंबांचं उत्तर प्रदेशात पुनर्वसन करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं हा निर्णय घेतलाय. बुधवारी, उत्तर प्रदेश मंत्रिमंडळानं या प्रस्तावाला मंजुरी दिलीय.

५० वर्षांपासून निर्वासित पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

या निर्वासित ६३ हिंदू बंगाली कुटुंबांचं उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागात पुनर्वसन करण्यात येईल. शेतीसाठी त्यांना दोन – दोन एकर जमीन तसंच घर बनवण्यासाठी २०० स्क्वेअर फूट जमीन कानपूरमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

तसंच या जमिनीवर घर उभारण्यासाठी मुख्यमंत्री आवास योजनेतून १.२० लाख रुपयेही या कुटुंबांना दिले जाणार आहेत.

यूपी सरकारनं या निर्वासित कुटुंबांसाठी कानपूर ग्रामीण भागात १२१.४१ हेक्टर जमीन पुनर्वास योजनेसाठी राखून ठेवलीय. या जमिनीवर भूमी सुधार आणि सिंचन सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवण्याचंही आश्वासन योगी सरकारकडून देण्यात आलंय.

या कुटुंबांना शेती आणि घरासाठी उपलब्ध करून देण्यात येणारी जमीन एक रुपया लीजवर ३० वर्षांसाठी देण्यात येईल. हा करार दोन वेळा ३० – ३० अर्थात एकूण ९० वर्षांसाठी नुतनीकरण करता येईल.

BJP MP Pragya Singh: ‘अजान’मुळे ‘आरती’त विघ्न, ध्यानात भंग; भाजप खासदाराची आक्षेपार्ह वक्तव्यं
arvind kejriwal : ‘क्रिकेटपटूच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणे म्हणजे हिंदुत्व नव्हे’
एकूण ६५ कुटुंब पाकिस्तानातून भारतात

वर्ष १९७० मध्ये पूर्व पाकिस्तानातून ६५ बंगाली निर्वासित कुटुंब उत्तर प्रदेशात दाखल झाले होते. या कुटुंबांना हस्तिनापूर मेरठमधील ‘मदन कॉटन मिल’मध्ये रोजगार देऊन मध्ये तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसित करण्यात आलं होतं. परंतु, ही मिल ८ ऑगस्ट १९८४ मध्ये बंद पडली. त्यामुळे पुन्हा एकदा या निर्वासित कुटुंबांवर बेघर होण्याचं संकट कोसळलं.

एव्हाना यातील दोन कुटुंबातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरीत ६३ कुटुंब १९८४ पासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत होते.

उत्तर प्रदेश विधानसभा निडवणूक २०२२

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निडवणुकीची भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा वेळी उत्तर प्रदेश सरकारनं ६३ हिंदू बंगाली कुटुंबांच्या पुनर्वसनाचा निर्णय जाहीर केला आहे.

Salman Khurshid: हिंदुत्वाची इसिसशी तुलना, सलमान खुर्शीद यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल
p chidambaram : ‘बाबरी मशीद कोणी पाडली नाही हे सांगताना लाज वाटते’, SC च्या निकालावर बोलले चिदम्बरम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: