आत्मनिर्भर भारत मोहीमेला यश;अर्थव्यवस्था सुस्साट, दिवाळीत १.३० लाख कोटींची बंपर उलढाल


हायलाइट्स:

  • भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे वाटचाल करत आहे.
  • केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या ताज्या हे मत अहवालात मांडले आहे.
  • आर्थिक पाहणी अहवालात मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षा देशाचा जीडीपी ११ टक्के असेल, असे भाकीत करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : स्थूल व सूक्ष्म अर्थशास्त्रीय निर्णय योग्य प्रकारे तसेच योग्य वेळी घेतल्यामुळे आणि या निर्णयांना अर्थजगताने प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे वाटचाल करत आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्रालयाने आपल्या ताज्या अहवालात मांडले आहे.

गुंतवणूकदारांची दिवाळी; ‘नायका’च्या शेअरची दमदार एंट्री, पदार्पणात एक लाख कोटींना गवसणी
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वेगाने केले जात असलेले लसीकरण आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येऊ लागली आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात करोना काळात निर्माण झालेली तफावतही वेगाने दूर होत आहे. त्याचवेळी रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळेही अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे या मासिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

करनोा काळात रुतलेले अर्थचक्र पुन्हा फिरते ठेवण्यासाठी आत्मनिर्भर भारत मोहीम साह्यभूत ठरली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही करणे शक्य झाले आहे. यातून व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या तसेच विविध आर्थिक मार्गांचे विस्तारीकरण करणेही शक्य झाले आहे. स्थूल व सूक्ष्म विकासाला दिलेली चालना यामुळे देशात गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढणारी जगातील अर्थव्यवस्था होताना दिसत आहे. देशात ही स्थिती असताना जागतिक अर्थव्यवस्था मात्र पुरवठ्यातील अनियमिततेमुळे अद्याप बाधित झालेली दिसत आहे.

चांगली बातमी! आता तुम्ही स्वत: करु शकता आधारचे ऑफलाइन व्हेरिफिकेशन, जाणून घ्या
आर्थिक पाहणी अहवालाचे निरीक्षण
वर्ष २०२०-२१ साठी यावर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षा देशाचा जीडीपी ११ टक्के असेल, असे भाकीत करण्यात आले आहे. जीडीपी इतका वाढण्यासाठी पुरवठ्यातील वाढ कारणीभूत ठरणार असल्याचे पाहणी अहवालात म्हटले आहे. आर्थिक सुधारणा, नियमांमध्ये शिथिलता, पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीला दिलेली चालना, उत्पादन संलग्न सवलत योजनेच्या माध्यमातून औद्योगिक उत्पादन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न, भासमान मागणी सत्यात उतरण्यासाठी केलेले प्रयत्न, लसीकरण आणि वित्तसंस्थांनी घटवलेले कर्जदर या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊन अर्थव्यवस्था सावरत असल्याकडेही पाहणी अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

कृषी क्षेत्राचे भरीव योगदान
अर्थव्यवस्थेच्या दमदार वाटचालीत देशाच्या कृषी क्षेत्राने आपला ठसा उमटवला आहे. रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे. जलसाठ्यांमध्येही वाढ झाली आहे. देशात सरकारकडून खतांची तसेच बियाणांची पुरेशी उपलब्धता करून दिली गेली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२१ या काळात कृषी निर्यातीत वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ झाली आहे. ग्रामीण भागातूनही कृषी उत्पादनांना वाढती मागणी आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये ट्रॅक्टर व दुचाकी यांना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवली गेली आहे.

अर्थव्यवस्थेला वेग यामुळे –

– यंदाच्या सणासुदीच्या दिवसांत वस्तूंच्या खरेदीत वाढ

– दिवाळीत गेल्या दशकभरातील सर्वाधिक १.३० लाख कोटी रुपयांची उलाढाल

– करोनाच्या तिसऱ्या लाटेची धूसर झालेली शक्यता

– बाजारातील सकारात्मक वातावरण

– संपुष्टात आणलेले निर्बंध आणि त्यामुळे ग्राहकांचे उंचावलेले मनोबल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: