हार्दिक पंड्याचे ग्रह फिरले, भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी बीसीसीआयने ठेवली मोठी अट…

नवी दिल्ली : भारताला अष्टपैलू खेळाडू हवा असेल, तर माझ्या भावला निवडा, असा तोरा एकेकाळी हार्दिक पंड्याने दाखवला होता. पण आता हार्दिक पंड्याचे ग्रहच फिरल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिकची निवड करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर हार्दिकला आता भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी बीसीसीआयने एक मोठी अट घातली आहे.