ग्राम सुरक्षा यंत्रणा जगातील सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा
ग्राम सुरक्षा यंत्रणा नेमकी काय आहे ?

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनविली व त्याचा वापर करून मानव प्रगतीही करत आहे . संपर्काची कधी नव्हे एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध असून सुध्दा प्रत्यक्ष संकट काळात म्हणजे आरा , चोरी , दरोडा , लहान मुल हरविणे . महिलांची छेडछाड ,वाहन चोरी,शेतातील पिकाची चोरी , गंभीर अपघात ,वन्य प्राणी ,बिबट्या,तरस , लांडगा यांचा हल्ला आदी घटनांमध्ये तातडीने जवळपास असणान्या नागरिकांशी तत्काळ संपर्क साधुन मदत मागणे आजच्या या उपलब्ध संपर्क साधनांद्वारे शक्य होत नाही . ग्राम सुरक्षा यंत्रणा ग्रामिण भागासाठी सुरू करण्यात आली आहे . गेल्या तीन वर्षापासुन शेकडो गावात सदर यंत्रणा कार्यान्वित आहे . ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर आपल्या गावातील ग्राम सुरक्षा यंत्रणेत नोंदवुन यंत्रणा वापरत आहेत . संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो . परिसरातील नागरिकांना घटना घडत असतांनाच तीची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते .
ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा एकच आहेत का ?
नाही . ग्राम सुरक्षा दल व ग्रामसुरक्षा यंत्रणा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत .
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नेमके फायदे काय ?
घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते . गावातील कार्यक्रम / घटना बिना बिलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात . अफवांना आळा घालणे शक्य होते . प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो . पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळते .
ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये
संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा . गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पध्दत. संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 18002703600 . यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो . संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात परिसरातील नागरिकांना मिळतो.दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता,ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबध्द मदत करता येते. नियमा नुसार दिलेले संदेशच स्वयंचलितरित्या प्रसारित होतात .नियमाबाह्य दिलेले संदेश / अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य आहे. वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० किमी परिसरा तील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते . संदेश पुढील १ तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय . चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅक लिस्ट होतात . गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात . सरकारी कार्यालये / पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचा आपत्कालीन संपर्क नं . 18002703600 आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल कसा करावा याच्या सरावासाठी नंबर 9595084943 ) ग्राम सुरक्षा यंत्रणेचे नियम / अटी 02248931236 / 9595006650 या नंबरवर उपलब्ध असून ग्राम सुरक्षा यंत्रणेतुन नंबर रद्द करण्यासाठी मो.नंबर 08047103710 .
ग्राम सुरक्षा यंत्रणा गावात सुरू कशी करावी ?
प्रत्येक गावात पोलीसस्टेशनकडून ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात येत आहे . स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गावाचे सरपंच , ग्रामपंचायत सदस्य , पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांची एकत्रित सभा घेवुन ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते . पंचायत समिती कार्यालयात स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक व गटविकास अधिकारी यांचे उपस्थितीत ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांना ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक देण्यात येते .
ग्राम सुरक्षा यंत्रणेत कोण सहभागी होऊ शकते ?
ज्या गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्या गावातील प्रत्येक नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी होवू शकतो . आपल्या गावात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे किंवा नाही यासाठी ग्रामपंचायत कार्यालय किंवा गावातील पोलीस पाटील यांचे कडे संपर्क करावा .
ग्रामस्थांनी यंत्रणेत सहभागी होण्यासाठी काय करावे ?
गावात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असेल तर ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामपंचायतने ठरवून दिलेल्या व्यक्तींशी संपर्क करून आपला मोबाईल नंबर ग्रामसुरक्षा यंत्रणेत नोंदवुन घ्यावा .
ग्राम सुरक्षा यंत्रणेत गावातील किती लोकांनी सहभागी व्हायला हवे याला काही मर्यादा आहे का ?
नाही.ग्राम सुरक्षा यंत्रणेत गावातील किती नागरिकांनी सहभागी व्हावे यासाठी कोणतेही बंधन नाही.
ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले नंतर काही यंत्र किंवा मोबाईल अँप चा वापर करावा लागतो का ?
नाही.ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झालेनंतर गावात कोणतेही यंत्र लावण्यात येत नाही किंवा नागरिकांना कोणत्याही मोबाईल अँप चा वापर करावा लागत नाही .