Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर रुग्णालय आग: ‘या’ कारणाने अटकेच्या कारवाईवरून वादळ


हायलाइट्स:

  • आगप्रकरणी अटकेच्या कारवाईवरून वादळ.
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक न झाल्याने नवा वाद.
  • परिचारिका संघटनेने घेतली आक्रमक भूमिका.

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या सहापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. वरिष्ठांना टाळून कर्मचाऱ्यांनाच अटक का केली, म्हणून परिचारिका संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आधीच एसटीचा संप सुरू असताना पुन्हा परिचारिकांचे आंदोलन सुरू झाले तर त्रास होईल म्हणून राजकीय पातळीवरूनही पोलिसांवर वेगळा दबाव येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या प्रकरणातील वरिष्ठांवरही लवकरच अटकेची कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून पोलिसांनी त्या दिशेने पावले टाकण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सबळ पुरावे हाती लागल्याने निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढाकणे यांच्या मागावर पोलीस असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Ahmednagar Hospital Fire Latest News )

वाचा: मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार!; मलिक यांनी फडणवीसांना ललकारले

अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिसांनी स्वत:हून सदोष मनुष्यवधाचे कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासात हाती आलेल्या माहितीनंतर त्यात कलम ३०४ वाढविण्यात आले आहे. याप्रकरणी आज सायंकाळी चौघांना अटक झाली. त्यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिकांचा समावेश आहे. त्यामुळे वरिष्ठांना सोडून कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा केले जात असल्याचे सांगत परिचारिका संघटना आक्रमक झाली आहे. अटक केलेल्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी त्यांच्यासाठी संघटनेतर्फे वकील नियुक्त करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

वाचा: SITने हाती घेतलं मलिक यांच्या जावयाचं प्रकरण; उचललं ‘हे’ मोठं पाऊल

घटनेतील मुख्य सूत्रधाराला पाठिशी घालण्यासाठी परिचारिकांना अटक केल्याचा आरोप करून राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. तर नागरिकांमध्येही कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती असून वरिष्ठांना सोडून कर्मचाऱ्यांनाच का अटक झाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची दखल राजकीय पातळीवरही घेण्यात आली आहे. एसटीचा संप सुरू असतानाच परिचारिकांच्या आंदोलनाची डोकेदुखी होऊ नये, यासाठी सरकारने काळजीपूर्वक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांचीही कोंडी झाली असून उरलेल्या आरोपींच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. यात कोणत्याही क्षणी आणखी काही आरोपींना अटक केले जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पोलिसांना सबुरीने घेण्याच्या सूचनाही मिळत असल्याचे कळते.

वाचा: ‘फडणवीस मुख्यमंत्री असताना तो अंडरवर्ल्ड डॉन…’; मलिक यांचा धमाका



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: