पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तराखंड आणि यूपीमधील शेतकरी २६ नोव्हेंबरला मोठ्या संख्येने दिल्ली सीमेवर पोहोचतील आणि सभांमध्ये सहभागी होतील. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांची महापंचायत होणार आहे, अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाकडून देण्यात आली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावेळीही प्रशासनाच्या परवानगीने शेतकऱ्यांनी जंतर-मंतरवर निदर्शने केली होती.
lakhimpur kheri case : मोठा खुलासा… लखीमपूर हिंसाचारात मंत्रिपुत्राच्या
rafale deal : राफेल सौद्यावरून झडल्या आरोपांच्या फैरी! ‘INC म्हणजे I Need Commission’, भाजपचा निशाणा
शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला २६ नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दिल्लीच्या तिन्ही सीमांवर एकत्र येण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे. या दिवशी देशभरात निदर्शने करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत मोर्चाची कोणतीही भूमिका राहणार नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.