केंद्र सरकार इदाते समिच्या अहवालाचा गंभीरपणे विचार करत आहे. तसेच या समितीने केलेल्या शिफारशींचा अतिशय बारकाईने अभ्यास केला जात आहे. यानंतर भटक्या जमातींना इतर मागासवर्ग श्रेणीबाहेरील आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने आता लवकरच निर्णय होईल असे वाटते असे आठवले यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जातील हे हास्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा टोला
भटक्या जमातींना ओबीसींच्या बाहेर आरक्षण देण्यासाठी इदाते समितीने समितीने सुमारे १० टक्के आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र यावर अजूनही कोणता निर्णय घेण्यात आलेला नसून मंत्रालय अद्याप या अहवालातील शिफारशींचा अभ्यास करत आहे, असे आठवले पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका, अन्यथा…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आठवले म्हणाले की, भटक्या जमातींबाबत बालकिशन रंके समितीने देशभरात सर्वेक्षण केले आहे. भटक्या जमातींची नेमकी स्थिती कशी आहे यावर समितीने पाहणी केली आहे. भटक्या जमीतीची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचेही समितीने दाखवून दिले आहे. देशातील अशा या भटक्या जमातींना वेगळे आरक्षण देता येईल का, याचाही अभ्यास सुरू आहे.