भारतीय संघाला आता तिन्ही सामने जिंकायचे असून त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान अफगाणिस्तान संघाचे आहे. गौतम गंभीरनेही भारताला अफगाणिस्तान संघापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गंभीर म्हणाला की, अफगाणिस्तानकडे श्रीलंका आणि बांगलादेशपेक्षा चांगले गोलंदाजी आक्रमण आहे.
अफगाणिस्तानची चांगली कामगिरी
अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले, तर टी-२० विश्वचषकात आतापर्यंत त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. या संघाने तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी स्कॉटलंड आणि नामिबियाचा सहज पराभव केला आणि पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानकडे राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान यांसारखे प्रतिभावान फिरकीपटू आहेत आणि भारतीय संघाला त्यांच्यापासून सावधगिरी बाळगावी लागेल. पाकिस्तान संघाला अफगाणिस्तानने कडवी झुंज दिली आणि सध्या तो संघ उत्कृष्ट लयीत दिसत आहे. त्यामुळे ते कोणत्याही संघाला धक्का देऊ शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना कोणत्याही संघाने गाफिल राहता कामा नये, कारण अफगाणिस्तान सध्याच्या घडीला उपांत्य फेरीच्या शर्यतीमधील दावेदार आहे.